मराठी कविता लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मराठी कविता लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शनिवार, 11 फ़रवरी 2012

मागचे 3-4 दिवस मी "अरुणा ढेरे"ह्यांचे पुस्तक वाचते आहे अर्ध्यावाटेवर त्यातिल काहि वाक्य मझ्या मनात रुजली त्यांना मी कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.बघा आवडतो का?

शब्दांचा अलिकडे थांबणॆ आता शक्य नाही
पण तडफडून शब्दा जवळ जाता  ही येत नाही,
शब्द कधी खूप ताठर, कधी माऊ पणाने भरलेले
पुष्कळ यातना शब्दा मध्ये घर करुन बसलेले
क्षणा मागे दूर लांबवर शब्दांचा वास असतो
आणि आलेले सगळे क्षण आपण शब्दांत भरतो
स्वतःला आपण अज्ञात तरी आपल्या कडे पहातो
ते मर्मस्पर्शी अनुभव ,झगडण,कोसळ्णे शब्दांत भरतो
स्वतः मधले अभाव,अधिक पाझरण ही दूःख असते
सगळ्याची सांगड घालून लिहणारे शब्द म्हण्जे छळ असते
फूला भोवती काँटे खूप
पण सुगंधि फूलाचा वास दे
सरले ढग सगळे जरी
मंद पावसाचा मृदु वास दे
तुझा प्रेमळ साथ दे
उजाडत्या पोर्णिमे मधे
हातात मझ्या हात दे
मावळ्ता चंद्र असला तरी
जीवना चा नाद दे
तुझा प्रेमळ साथ दे
कवितेच्या वाटेवर मला
तुझा आनंदा चा साथ दे

सोमवार, 16 जनवरी 2012

कविता

लिहि म्हंटल की कविता कशी लिहायची,
शब्दांना काना,मात्रा,वेलांटी कशी द्यायची,
प्रेम कविता लिहीण्यास स्वप्नात तरी प्रेम करावे लागते,
विनोदी कविता करयला मनात हास्य अणावे लागते,
विरह गीत लिहीण्या साठी विरह जगायलाच पाहिजे,
मनात असलेल्या क्षणाला सार्थक शब्दच आला पाहिजे,
प्रयत्नांतरी विडंबन काही सगळ्यांना जमत नाही,
विडंबन करायला तर रेष ही कगदावर उमटत नाही,
कविता करायला मनात तसे भाव जगावे लागतात,
आणि तेव्हा कुठे शब्द -म्हणी कवितेत गुंफतात